मुंबई : गेले पाच दिवस विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरल्यानंतर आज अधिवेशनात शेवटचा दिवस आहे. अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आज चर्चा होणार आहे. तब्बल 23 लक्षवेधी सूचना विरोधकांकडून मांडण्यात आले आहेत. म्हणजेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रोजगार भरती, आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण, रस्त्यांची दुर्दशा आदी मुद्द्यांवर मंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. त्यामुळे आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल सत्ताधार पक्षांच्या आदोलनानंतर मात्र बराच राडा पाहायला मिळाला. यावेळी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची पर्यंत गोष्टीं घडल्याने कालचा दिवस अतिशय वादळी ठरला.
आज सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आहेत का, हे लवकरच समजेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.