समीर वानखेडेंवर कारवाई होणार? गृहमंत्री वळसे पाटलांनीच केली मागणी

एनसीबी आर्यन खानला क्लिनचिट दिल्यामुळे समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Dilip Walse Patil & Sameer Wankhede Latest Marathi News
Dilip Walse Patil & Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्लिनचिट देण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) आरोपपत्रातून त्याचं नाव वगळलं आहे. तर एनसीबी मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वानखेडे यांच्या कारवाई व्हायला हवी, असं वक्तवव्य केलं आहे. (Sameer Wankhede Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, आर्यन खानविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने आरोपपत्रातून त्याचं नाव वगळण्यात आले. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाईच्या सुचना दिल्याचे समजते.

Dilip Walse Patil & Sameer Wankhede Latest Marathi News
या तीन कारणांमुळे आर्यन सुटला; 'एनसीबी'नंच दिली कबुली

जर कुणी चुकीच्या पध्दतीने एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटकवत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. मला वाटतं एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळलं, त्यावरून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, एनसीबी नेमलेल्या एसआयटीचा अहवाल उघड झाला आहे. अहवालात म्हटलं आहे की, तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कशाही प्रकारे आर्यन खानला अडकवायचं होतं. ड्रग्ज ज्या व्यक्तीकडं सापडत नाही, अशा व्यक्तीला न्यायालय नेहमी दिलासा देतं. याचबरोबर पुरेसा पुरावा नसलेल्या व्यक्तींबाबतही न्यायालय कठोर भूमिका घेत नाही. मात्र, तपास अधिकारी जाणीवपूर्वक काही गोष्टी करीत आहेत, हे निदर्शनास आल्यानंतर न्यायालय याबद्दल प्रश्नही उपस्थित करते. तपास अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाईल जप्त केला. यासाठी कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलं नाही. त्या मोबाईलमधील डेटा आणि व्हॉट्सअॅप चॅटही काढून घेण्यात आले.

Dilip Walse Patil & Sameer Wankhede Latest Marathi News
आर्यन खानला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न! एनसीबीनं वानखेडेंवर फोडलं खापर

दरम्यान, 'एनसीबी'चे उपमहासंचालक संजयसिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांनी यासाठी तीन कारणे दिली आहेत. त्यानंतर आर्यन खानला क्लिनचिट देण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

1. सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.

2. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.

3. आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com