शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळपासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावलीय!

राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऊसाचे गाळप होत नसल्याने एका शेतकऱ्याने (Farmer) ऊसाचा फड पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगणगाव (ता. गेवराई) येथे घडली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऊस गाळपासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे सांगत शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहनही केलं आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)

मुंबईत माध्यमांशी बोलताना पवार यांनी अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, गळीत हंगाम लांबलाय. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने एप्रिल अखेरपर्यंतही ऊस संपला नाही. त्यामुळे मेमध्ये आम्ही रिकव्हरी लॉस आणि वाहतूक अऩुदान दिले आहे. आम्ही सतत स्थितीचा आढावा घेत आहे. तरीही बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

Ajit Pawar
हास्यास्पद! खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नानांना अजितदादांनी 'ती' आठवण करून दिली

मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, घाबरून जाऊ नको. सगळा ऊस गळिताला नेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. ऊस संपवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकार तुमच्या पाठिशी आहे. टोकाची भूमिका घेऊ नका. ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत, असं पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नामदेव आसाराम जाधव (वय ३०, रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात चार सहकारी आणि दोन खासगी सहकारी साखर कारखाने (Sugarcane) ऊसाचे गाळप करत आहेत. अद्यापही या सर्व कारखान्यांचे गाळप सुरु आहे.

Ajit Pawar
धक्कादायक : दोन एकर ऊस पेटवून शेतकऱ्याने घेतला गळफास

हिंगणगाव (ता. गेवराई) येथील नामदेव जाधव यांचा दोन एकर क्षेत्रावर ऊस आहे. ऊसाचे गाळप होत नसल्याने ते हवालदिल होते. याच नैराश्येतून त्यांनी बुधवारी ऊसाचा फड पेटवून दिला आणि शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावला. दरम्यान, हिंगणगाव येथील १०१ हेक्टरांवरील ऊसाची नोंद जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे होती.

नोंद असलेला सर्व ऊस गाळप झाला आहे. येथीलच नोंद नसलेला २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप केला आहे. नामदेव जाधव यांचा नोंद नसलेला ऊस देखील गाळपाचे नियोजन होते. त्यांनी मागच्या वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याला ऊस पाठविल्याची माहिती, जयभवानी कारखान्याच्या पत्रकात देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com