ईडीवादाचा हा पराभव ; भाजप नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेनं नाकारलं!

कोल्हापूरकर द्वेष तिरस्काराचे राजकारण मान्य करत नाहीत आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे अधोरेखित झाले.
Chandrakant Patil, Sachin Sawant
Chandrakant Patil, Sachin Sawant sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे.

या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने भाजपला पराभूत केले आहे. (Kolhapur north assembly by election News Update)

कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे.

Chandrakant Patil, Sachin Sawant
कोल्हापुरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले ; संजय राऊतांचा टोला

बिलोली देगलूर निवडणुकीनंतर मविआ सरकारच्या पाठीशी जनता आहे हे पुन्हा दिसले. भाजपाच्या दमनशाही व इडीवादाचा हा पराभव आहे. धर्मांधता आणि भाजपाच्या नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेने नाकारले,'' असे टि्वट करुन सचिन सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.

''कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील मविआच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचंड बहुमताच्या विजयाने कोल्हापूरकर द्वेष तिरस्काराचे राजकारण मान्य करत नाहीत आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे अधोरेखित झाले. @satejp यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे,'' असे सावंत यांनी म्हटलं आहे.

Chandrakant Patil, Sachin Sawant
राऊत हे बोलवते धनी, उद्धव ठाकरे हेच मास्टरमाईंड ; सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल

माध्यमांशी बोलताना विजयी उमेदवार जयश्री जाधव, म्हणाल्या 'आज अण्णा सोबत नाहीत याची खंत आहे. त्यांची पावलोपावली आठवण येते. कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या माघारी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं,''

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि माझ्या जनतेला माझ्या विजयाचे श्रेय देईन. जनतेने भरभरून मते दिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने न्याय दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडलेत,'' असेही जयश्री पाटील म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com