Political News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी मोठी घडामोड; किरेन रिजिजू यांनी घेतली नार्वेकरांची भेट : उद्धव ठाकरे म्हणतात...

Kiren Rijiju, Rahul Narvekar News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे
Kiren Rijiju, Rahul Narvekar, Uddhav Thackeray News
Kiren Rijiju, Rahul Narvekar, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Supreme Court News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुंबईत भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

किरेन रिजिजू आणि राहुल नार्वेकर यांची विधानभवनात बंद दाराआड दोघांमध्ये ही भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचे काय-काय कायदेशीर पडसाद उमटू शकतात, सरकार टिकवण्यासाठी काय करता येईल, अशा मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्राची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १५ मेच्या आधी येणार असल्याचे सांगितले जात आहे. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 या तारखांमध्ये कोणत्यादी दिवशी निकालाची शक्यता आहे.

Kiren Rijiju, Rahul Narvekar, Uddhav Thackeray News
Supreme Court News : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार... 'या' तारखा महत्त्वाच्या...

सर्वोच्च न्यायालयाने जर शिंदे गट (शिवसेना) 16 आमदारांना अपात्र करण्याचा आदेश दिला, तर सरकारपुढे कोणते कायदेशीर पर्याय असतील यावरही चर्चा झाल्याचे बोलेल जात आहे. रिजिजू आणि नार्वेकर यांच्यातल्या या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबद्दल भाष्य केले.

बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीचाच संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, देवेशचंद्र ठाकूर यांच्याशी आमची चर्चा झाली. कोणी म्हटले ही राजकीय चर्चा होती, तर मग मी किरेन रिजिजू (Kiren Rijiju) आणि राहुल नार्वेकरांची (Rahul Narvekar) भेट ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर झाली, असे म्हणायचे का? असा सवाल त्यांनी केला.

Kiren Rijiju, Rahul Narvekar, Uddhav Thackeray News
Sharad Pawar : 'अजितने दिलगिरी व्यक्त केली, आमच्यासाठी तेवढे पुरेसे होते' : पहाटेच्या शपथ विधीविषयी पवारांचा पुस्तकात मोठा खुलासा

दुसरीकडे नार्वेकरांनी रिजिजू यांच्यासोबत भेट झाली असे म्हटले आहे. नार्वेकर म्हणाले, किरेन रिजिजू एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे मी त्यांना चहापानासाठी बोलावले होते. दोघांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे मात्र, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com