Jitendra Awhad : शिवरायांवरील वक्तव्यावरुन आव्हाड भाजप प्रवक्त्यांवर संतप्त ; म्हणाले..

Jitendra Awhad : शिवाजीमहाराजांबाबत त्रिवेदींनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
sudhanshu trivedi, Jitendra Awhad
sudhanshu trivedi, Jitendra Awhad sarkarnama

Jitendra Awhad : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते.

सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. सावरकरांवरील वादग्रस्त विधानावरुन राजकारण तापलं असताना त्यात शिवाजीमहाराजांबाबत त्रिवेदींनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

sudhanshu trivedi, Jitendra Awhad
Sanjay Raut : भाजपाला सावरकर प्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग.. !

"छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस माफीचे पत्र लिहिले," असे वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर केले आहे. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजप प्रवक्त्याच्या या वक्तव्याने यात भर घातली आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करीत त्रिवेदींवर टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य ठार वेडाच करू शकतो," अशा शब्दांत आव्हाडांनी त्रिवेदींना सुनावले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुधांशू त्रिवेदींवर सडकून टीका केली आहे. "भाजपची हीच भूमिका आहे का ?, हे भाजपने स्पष्ट करावे," असे राऊत म्हणाले.

"राष्ट्रीय प्रवक्ते वृत्तवाहिनीवर जे काही बरळलेत ती भाजपची भूमिका नसेल तर प्रवक्त्यावर कारवाई करावी," अशी मागणीही राऊतांनी केली. या वक्त्यावरून राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. राऊत म्हणाले, भाजपचे प्रवक्ते शिवरायांचा अपमान करत असतील तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे?

सुधांशू त्रिवेदी नेमके काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "सावरकरांच्या काळाच अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास असे पाच पत्र लिहिले होते,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com