Politics News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपर्वी सुरू होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे अचानक आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पण एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता त्यांनी माध्यमांशी बोलताना अवघ्या पाच शब्दांत उत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले की, "तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं", अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच उदय सामंत यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन गावाला गेले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर सामंत म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा आहे. ते गावच्या यात्रेला गेले आहेत. मुख्यमंत्री आपल्या गावाला गेले गेल्यावर देखील मुख्यमंत्री नाराज आहेत, असं कुणी म्हणत असेल तर त्यांचा सत्कार केला पाहिजे ", असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवस सुट्टी घेत ते आपल्या गावी गेले आहेत. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच ते नाराज असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतली का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.