Bhagatsingh koshyari : माझ्या काळात रोज दोन-तीन हजार लोक यायचे; हा माझा दोष आहे का?

राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच भगतसिंह कोश्यारीनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे.
Bhagatsingh koshyari
Bhagatsingh koshyariSarkarnama

Bhagatsingh koshyari : वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश बैंस यांची महाराष्ट्राच्या राज्यापाल पदी नियुक्ती करण्यात आली. पण आपल्या कार्यकाळात कोश्यारी अनेक मुद्द्यावरुन चर्चेत राहिले होते. विशेषत: महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आता राज्यापालांच्या राजीनाम्यानंतर कोश्यारींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

कोरोना महामारी काळात कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत आपण हिंदुत्व सोडलं का, अशा आशयाचे पत्र लिहीले होते. तर कोणतेही राज्यपाल मुख्यमंत्र्यांना असे पत्र लिहू शकतात का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला कोश्यारींनी उत्तर दिले आहे. माझ्या पत्रानंतर गृहमंत्री म्हणाले होते की आपण संयम राखला पाहिजे, आता वरिष्ठांनीच संयम राखण्यास सांगितलं तर माझ्या बोलण्याचा प्रश्न येत नाही. त्यावर, हे पत्र तुमचे होते पण त्यातील शब्द दुसऱ्या कुणाचे होते, असा प्रश्न विचारल्यावर कोश्यारी म्हणाले की असं काही नाही, ते पत्रही माझं होतं आणि त्यातील शब्दही माझे होते.

Bhagatsingh koshyari
Shivsena Bhavan : बॉम्बस्फोट ते पक्षातील फूट... ; अनेक धक्क्यांचं साक्षीदार आहे 'शिवसेना भवन', एकदा वाचाच...

हे राज्यपाल नाही हे भाज्यपाल आहेत, हे राजभवन नाही हे भाजपाभवन आहे, असा सवाल केला. त्यावर, राज्यपाल सरकारी अधिकारातून बोलू शकत नाही का, राज्यपाल सरकारी अधिकाऱ्यांच स्वागत करत नाहीत का, प्रोटोकॉलमध्ये हे सर्व येत नाही का, माझ्याकडे रोज दोन ते तीन हजार लोक यायचे, ते नेते मंडळीही असायचे आणि सरकारी अधिकारीही असायचे, मग मी त्यांचं ऐकूनही घ्यायचं नाही का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला.

विरोधी पक्षनेत्यांच्या आरोप असायचा की राजभवनातून भाजपचे राजकारण करत चालतात. महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंवर, आरोप करणाऱ्यांना राजभवनात बोलावून त्यांचं स्वागत केलं जातं. या प्रश्नावर बोलताना कोश्यारी म्हणाले की, तुम्ही लक्षात ठेवा की राजभवनात कोणी सरकारच्या विरोधात बोलो अथवा सरकारच्या बाजूने बोलो, राजभवन प्रत्येकाचे आहे. राजभवन काय सरकारचे आहे का, राजभवन सरकारचे नोकर आहे का, राजभवनाला सर्वकाही पाहायचं असतं, आम्ही काय सरकारचा विरोध केला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com