Bhagatsingh Koshyari|
Bhagatsingh Koshyari|

गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Bhagatsingh Koshyari| राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यापुर्वीही त्यांनी समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सामान्य नागरिकांसह विरोधक त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. राज्यपालांचं या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत त्यांच्यावर आगपाखड केली आहे.

Bhagatsingh Koshyari|
Nashik News: नाशिकचे शासकीय विश्रामगृह बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान?

''महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. ''महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.

त्यानंतर आता कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील राज्यपालांवर निशाणा साघला आहे. ''राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.'' असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com