
Maharashtra Political Crises : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गेल्या अडीच दिवसांपासून सुरु सिब्बल ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. नुकताच सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. पण शेवटच्या टप्प्यात कपिल सिबल प्रचंड भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
''मी ही केस जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी मी इथे उभा नाही, पण देशातील घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी मी इथे उभा आहे.'' असे सांगत कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला.
'' फक्त या प्रकरणासाठी मी उभा नाही. आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी मी इथे उभा आहे. देशाचे संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी उभा आहे. जर न्यायालयाने हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० पासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली, तिचा मृत्यू होईल, अशी भावनिक सादही यावेळी सिब्बल यांनी न्यायालयाला घातली.
आज युक्तिवाद करताना सिबल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्द्यांकडे न्यायलयाचे लक्ष वेधलं. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलवलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हेच निश्चित झालेलं नव्हतं. राज्यघटनेनुसार राज्यपालांना ते ठरवण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे त्यांची ही कृती घटनाविरोधी होती, असं सिब्बल यांनी सांगितलं.
तसेच, सत्तासंघर्षाच्या वेळी राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे आदेश दिले म्हणजेच त्यांनी शिवसेनेतील फुटीलाच मान्यता दिल्यासारखे आहे. पण राज्यपालांना तो अधिकारच नाही. त्यामुळे आम्ही विश्वासदर्शक ठरावाला आव्हान दिलंय, असंही सिब्बल यांनी यावेळी सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.