'वेदांता' प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? सखोल चौकशीची राज ठाकरेंनी केली मागणी

Raj Thackeray : राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही.
Eknath Shinde-Raj Thackeray Latest News
Eknath Shinde-Raj Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यासाठी महत्वाचा असणारा 'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प हा राज्याबाहेर म्हणजे गुजरातला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. यामुळे राज्याच्या हितासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून राज्याबाहेर जाणारी गुंतवणुक थांबवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटून केली आहे.

दरम्यान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इतका महत्वाचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? याबाबत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारची गोची झाली आहे. (Eknath Shinde-Raj Thackeray Latest News)

Eknath Shinde-Raj Thackeray Latest News
मनसे विद्यार्थी सेनेच्या विभागीय अध्यक्षावर चाकूने हल्ला...

राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं.अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?", अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केल आहे.

Eknath Shinde-Raj Thackeray Latest News
'वेदांता' प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला; अजितदादांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. याप्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.

मात्र या कंपनीने महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली आणि तसा अहवालही कंपनीच्या वतीने तयार करण्यात आला होता आणि त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग विभागाशी बोलणी सुद्धा झाली होती. तसेच प्रकल्पाची जागा निवडीसाठी एकुण 100 मुद्दांचा विचार करून 'वेदांत' ग्रुपकडून तळेगांवातील टप्पा 4 ही जागा अंतिम करण्यात आले होती. तसेच तळेगांवातील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ॲटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटी बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने या कंपनीने तळेगांवात एक हजार एकर जागेची निवडही केली असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. आता याबाबत राज ठाकरे यांनीही आपलं मत व्यक्त करत हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच कसा?, यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. यामुळे यावर शिंदे-फडणवीस सरकार काय उत्तर देणार हे बघाव लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com