मनसेविरुद्ध पोलिस राज्यभर आक्रमक : १५ हजार जणांवर कारवाई, १३ हजार नोटीस

Raj Thackeray| Maharashtra Police| Dilip Walse-Patil| महाराष्ट्र पोलीस राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम
महासंचालक रजनीश शेठ
महासंचालक रजनीश शेठ

मुंबई : “ राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधीच समाजकंटक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. तसेच, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये असा इशाराही रजनीश शेठ यांनी दिला.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंत राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करु नका, असे आदेश या नोटीसांमध्ये देण्यात आले आहेत.

महासंचालक रजनीश शेठ
राज ठाकरेंच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस; संजय राऊत म्हणाले...

सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या असून राज्यभरात एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पण जर कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होणारच. त्यामुळे राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं, असं जनतेला आवाहन यावेळी त्यांनी केलं.

राज्यात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १३ हजार लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती रजनीश शेठ यांनी दिली आहे.

यावेळी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाबाबत विचारले असता रजनीश शेठ म्हणाले की, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाची सखोल पडताळणी केली असून आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती नक्कीच करतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com