राज्यात उद्यापासून कडक लॉकडाउन; मुख्यमंत्री ठाकरे करणार घोषणा

राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सरकारने लॉकडाउन लावण्याची तयारी केली आहे.
health minister rajesh tope says total lockdown in maharashtra from tomorrow
health minister rajesh tope says total lockdown in maharashtra from tomorrow

मुंबई : कोरोनाला अटकाव करण्यासाठी 5  ते 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला होता. तरीही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (ता.21) घोषणा करणार असून, उद्या रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या संकटाविषयी चर्चा झाली. या बैठकीत लॉकडाउन लावण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संपूर्ण लॉकडाउन लावावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता याबद्दलचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. 

18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस द्यावी, याबाबतचे केंद्र सरकारचे पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी वेगाने लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही थेट इतर देशांकडून कोरोना लस खरेदी करू, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीनंतर बोलताना मंत्री अस्लम शेख म्हणाले की, राज्यात रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्र आता लॉकडाउनच्या दिशेने जात आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. 

आज दुपारीच नवीन निर्बंध जाहीर 
राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. लोक किराणा, दूध आदी वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली दिवसभर फिरत असल्याचे चित्र आहे. आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास खुली ठेवण्याचा आदेश आज दुपारीच सरकारने काढला आहे. 

नव्या आदेशानुसार असे असतील निर्बंध 
1. सर्व  किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, मासे आणि अंडी), कृषीविषयक दुकाने, पावसाळी साहित्याची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहतील. 
2. होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. 
3. अत्यावश्यक सेवांना कोणतेही बंधन नसेल. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com