Maharashtra pavsali adhiveshan 2022 : सरकार बोलण्यात जास्त.. कामात शुन्य... जयंत पाटलांचा घाणाघात

१५ वर्षे 15 years Old जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना Oppositions बदनाम करण्याची ही चाल आहे, अशी टीकाही जयंत पाटील Jayant Patil यांनी केली.
Eknath Shinde, Jayant Patil
Eknath Shinde, Jayant Patilsarkarnama

मुंबई : अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो. मात्र, मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शुन्य आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे

सध्या सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत.

Eknath Shinde, Jayant Patil
एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : माझ्या आणि फडणवीसांच्या संपर्कात अनेक आमदार...

१५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही, आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com