गोविंदांना मिळणार सरकारी नोकऱ्यांत आरक्षण : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांत संताप

राज्य सरकारने दहिहंडीतील गोविंदांना खेळाडूंच्या कोट्यातून शासकीय नोकरीत आरक्षणाची तरतूदही केली आहे.
Dahihandi
DahihandiSarkarnama

Maharashtra government : राज्य सरकारने आज दहिहंडीला खेळाचा दर्जा दिला. तसेच दहिहंडीतील गोविंदांना खेळाडूंच्या कोट्यातून शासकीय नोकरीत आरक्षणाची तरतूदही केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आता गोट्या, विटीदांडू खेळणाऱ्यांनादेखील आरक्षण द्या, अशा शब्दांत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा बहाल करत सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण जाहीर केल्याने स्पर्धा परीक्षांसाठी दिवसरात्र तयारी करून एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Dahihandi
बायका बांगड्या भरतील म्हणून राम कदमांकहून दहिहंडी रद्द, मनसेने केले लक्ष्य 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांसाठी विमा कवच तसेच सरकारी नोकरीत आरक्षण अशा विविध प्रकारच्या घोषणा गोविंदा पथकांसाठी केल्या आहेत. मात्र, यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘गोविंदाना खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. हा निर्णय सरकारने मागे घ्यायला हवा. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर आणि खेळाडूंवर या निर्णयामुळे अन्याय होईल. खेळाडू प्रमाणपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत असताना सरकारने घेतलेला निर्णय धोकायदायक आहे,’ असे एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर म्हणाले.

Dahihandi
'या खेळाचा खरा मास्टरमाईंट कोण?'

वर्षातून एकदा खेळणारे खेळाडू कसे?

गोविंदासारख्या खेळांचा खेळाडू आरक्षणात समावेश करण्यापूर्वी बोगस खेळाडू प्रमाणपत्र घेऊन शासन सेवेत नोकरी मिळविणाऱ्यांवर सरकारने कारवाई करायला हवी. गोविंदा हा वर्षातून एकदा होणारा खेळ असल्याने हा खेळ खेळणारे खेळाडू गटात कसे येतील. या निर्णयाचा पुनर्विचार सरकारने करायला हवा, असे एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे यांनी सांगितले.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरांतील महापालिका डोळ्यांसमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे विद्यार्थी करीत आहेत. त्यासोबतच सरकारने हा जो पूर्ण खेळ लावला आहे, तो बंद करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्या विद्यार्थ्यांनी दिला. आधीच अनेक पदे रिक्त असताना त्यावर चर्चा करायची सोडून सरकार जुमलेबाजी करीत असल्याचा आरोपदेखील या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com