मुंबई : राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा वातावरणात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, "साडेचार हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसंच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल. दीड महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचली" "सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे केले जातील," असे फडणवीस म्हणाले.
"नुकसानीचा पंचनामा थेट सँटेलाईटच्या माध्यमातून करता येईल, यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाईल. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम उभारली जाणार आहे," असे फडणवीस म्हणाले. भूविकास बॅँकेतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, यातून २६४ कोटी रुपये कर्ज माफी देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.