मंत्रीपदासाठी इच्छुकांचे फोन खणखणने थांबेना : विस्तार रखडण्याचे हे आहे खरे कारण

शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही.
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News Sarkarnama

Eknath Shinde : मुंबई : शिंदे सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंत्रीमंडळाची यादी घेऊन दिल्लीला गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना विस्तार होणार की नाही, यासाठी फोन येत आहेत. त्याला उत्तर देताना त्यांची गोची होत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुरु असलेल्या सुनावणीमुळेच विस्तार रखडल्याचे सांगितले जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे राज्यातील राजकीय तिढा आणखी वाढला आहे. शिवसेना (ShivSena) आणि बंडखोर आमदारांबाबतच्या याचिकांची लांबणीवर पडलेली सुनावणी, न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेले आदेश यामुळेच हा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
मंत्रीमंडळ विस्तार : तारीख पे तारीखमुळे इच्छुकांनाही विश्वास बसेना..

आता पुन्हा रविवारी (ता. ७) किंवा त्यानंतर लवकरच विस्तार होईल, असे सांगून सरकारमधील नेते वेळ मारून नेत आहेत. भाजपचे (BJP) ७ आणि शिंदे गटाचे ५ जण शपथ घेतली असे सांगितले जात होते. परंतु, शिवसेना आणि बंडखोरांबाबतच्या याचिकांची सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे शपथविधीची चर्चा थांबली. त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज अस्वस्थ वाटू लागल्याने दिवसभरातील त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार दीपक केसरकर हे दिल्लीला रवाना झाले. मंत्रिमंडळ विस्तारातील भाजप आमदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे, न्यायालयीन लढाईत शिंदे गटाला धक्का बसण्याच्या शक्यतेने फडणवीस, केसरकर हे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
एकनाथ शिंदे संघर्षाच्या पवित्र्यात : ‘अंगावर आले तर शिंगावर घ्या; समर्थकांना सूचना!’

मंत्रीमंडळ विस्तारापुर्वी करावी लागणारी तयारी, संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन या सगळ्या प्रक्रिया पाहता उद्याही मंत्रीमंडळ विस्तार होणे शक्य नसल्याचे सांगितले जाते. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील उद्या दिल्लीत जाणार आहेत, त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार सध्या तरी शक्य दिसत नाही. राज्यपाल, कोश्यारी, उपमुख्यमंत्री फडणवीस नसतांना विस्तार कसा शक्य आहे. पुन्हा ७ आॅगस्ट रोजी दिल्लीत निती आयोगाची बैठक आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागणार आहे. त्यामुळे ७-८ आॅगस्टनंतरच कदाचित विस्तारावर निर्णय होऊ शकतो, असे माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com