सत्तेत असतानाच शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरु होत्या; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde| लोकांचीही मागणी होती. लोकांचा जनादेश जो होता तो भाजपच्या बाजूने होता.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shindesarkarnama

पुणे : अडीच वर्षांच्या मधल्या काळात भाजप शिवसेनेच्या एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु होत्या, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

अडीच वर्षांच्या मधल्या काळात शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी चर्चा सुरु होत्या, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटले होते आणि त्यावेळीही भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न सुरु होते. पण दुर्दैवाने ते करु शकले नाहीत, हे राज्याचं दुर्भाग्य़ आहे. अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे जे व्हायचं होतं तेच झालं.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात पुन्हा येणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

२०१९ मध्ये आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. पण राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जात नव्हते, शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघातील नागरिकांचा अपेक्षा पुर्ण होत नव्हत्या. आम्ही यात अनेकदा बदल करण्याचे प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही. आम्ही अनेकदा उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्यासाठी मागणी केली पण तेही होऊ शकले नाही. लोकांचीही मागणी होती. लोकांचा जनादेश जो होता तो भाजपच्या बाजूने होता. भाजप शिवसेना गेल्या पंचवीस वर्षांपासून आघाडीत आहे. लोकांचीही तीच इच्छा होती.

गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलणे झाले होते. ते अमित शहा यांनी पाळले नाही म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली, हे तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं का, असा सवाल त्यांना विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, सांगितलं होतं. पण, ते फक्त दोघांमध्ये झालेलं बोलण होतं. आता २०१९ मध्ये झालेली चूक आपण सुधारु आणि भाजपसोबत पुन्हा जाऊ, असं आम्ही त्यांना सांगितलं होते.

आमचे आमदार नाराज झाले होते. त्यांची दुखणी ऐकून मी उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. पण काहीही झालं नाही. आम्ही चुकीचं काही केलं नाही, जनतेचा जो जनादेश होता तो भाजप-शिवसेनेला होता. बाळासाहेबांचा जे विचार होते. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा करत आहेत. मग आम्ही काय चुकीचं केलं. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com