
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या झालेल्या दोन गटांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शिवसेनेचे जे दोन गट झालेले आहेत हे भविष्यात कधी एकत्रित येईल का? शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट भविष्यात पु्न्हा एकत्रित येऊन जुळतील का? या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी अधिक स्पष्टच उत्तर दिले. एका खाजगी वृत्तवाहिनीने त्यांची दीर्घ मुलाखती घेतली. यावेळी ते बोलत होते.
एआयडीएमके चे दोन गट जय म्हणजे, जय ललिता आणि जानकी रामकृष्णन गट नंतर सोबत आले, तेलगू देसम पार्टीचे दोन गट एकत्र आले. याप्रमाणे शिवसेनेचे दोन गट कधी एकत्र येणार का?, असे प्रश्न विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आता मागे जाण्यात काही अर्थ नाही. आता आमची महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. आम्ही शिवसेना भाजपा युतीत काम करतो, एवढं मला माहिती आहे." अशी भूमिका शिंदेंनी घेतली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात पुन्हा एकदा सोबत येण्याचा काही विचार आहे का? "दोघेही बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे गट आहेत. तर काही विचार? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, "आता बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांच्या विचारांमुळेच आम्हाला जनसमर्थन मिळत आहे. आता त्यांनी विचार करायचं आहे की, त्यांना काय करायचंय."
मुख्यमंत्री शिंदेकडून आता शिवसेनेच्या दोन्ही गट एकत्र येतील का ? या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. भविष्यात दोन्ही गटांमध्ये पुन्हा काही सूर जुळून येतं का? हे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयीतील निर्णयानंतरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.