
मुंबई : आमचं सरकार म्हणजे केवळ 'माझं कुटूंब माझी जबाबदारी' असं नसून महाराष्ट्रात सामान्य जनतेचं सरकार आहे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत लगावला. राज्यपालाच्यां अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. महाविकास आघाडीच्या सरकारसह त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मार्मिक शेरेबाजी केली.
विरोधकांनी केलेल्या वर्षा या निवासस्थानच्या चहापानावर दोन कोटी रूपयांच्या खर्चाच्या आरोपाची शिंदे यांनी खिल्ली उडवली. दोन वर्षे वर्षा निवासस्थान सामान्य माणसांसाठी बंद होते. तरी चहापानाचे बिल आले का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही चहामधे सोन्याचे पाणी टाकत नाही. पण सोन्यासारखी माणसं येतात, त्यांना चहापान पण देणार नाही का ? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.
"माझ्याकडे मविआ सरकारमधील घडामोडीची संपुर्ण माहिती असून, ती वेळेवर बाहेर काढणार. जर विरोधकांनी सरकारला सहकार्य केले नाही, तर मग आमदारांच्या विकास निधीच्या कामावरील स्थगिती कशी उठवणार?" असेही मुखयमंत्र्यांनी सुनावले.
दरम्यान, 'माझ्यात अन फडणवीस यांच्यात राजकिय तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. पण आम्ही एक आहोत. कसबा पोटनिवडणुकीत आम्ही हरलो. पण ज्या ज्या वेळी भाजप पोटनिवडणुकीत हरते, त्यानंतर अख्खं राज्य जिंकून आणते. अन आता तर मी सोबत आहे. निवडणूका कशा जिंकायच्या याचा मला चांगला अनुभव आहे, अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.