
Mumbai News : भाजपविरोधात एकत्रित आलेल्या इंडिया आघाडीची राजधानी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस असणार आहे. विशेष बाब म्हणजे आज आघाडीकडून 'लोगो'चं (चिन्ह) अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याच अनुषंगाने या 'इंडिया'च्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. (Latest Marathi News)
मुंबईच्या ग्रँड हयात या सप्ततारांकित हॉटेलमध्ये पार पडत असलेल्या इंडिया आघाडीच्या या बैठकीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशन, संभाव्य विधेयकांची शक्यता, आणि मुख्य म्हणजे 'वन नेशन-वन इलेक्शन' यावरही चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीककडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली होती.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारने हे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अधिवेशनात नेमकं मोदी सरकार काय मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.