एकनाथ शिंदेना सुरक्षा नाकारल्याचा कांदेंचा आरोप: वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

Dilip Walse-Patil | Suhas kande| माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला.
Dilip Walse-Patil | Suhas kande|
Dilip Walse-Patil | Suhas kande|

मुंबई : ''राज्यातील कोणत्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवायची हा निर्णय राज्याच्या गृहविभागाकडून घेतला जातो. राज्यातील पुर्व उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती,'' असे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.

शिंदे गटातील आमदार सुहास कांदे (suhas kande)यांनी शुक्रवारी (२२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला.

Dilip Walse-Patil | Suhas kande|
‘डीपीसी’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला; २९ ऑगस्टला मतदान, ३० ला मतमोजणी...

यानंतर वळसे पाटील यांनी या आरोपांवर उत्तर दिले आहे. ''एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना, पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा अनावश्यक चर्चा आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात. पोलीस विभाग त्याचे अॅनॅलिसीस करुन त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवत असतात. त्याप्रमाणे पोलीस दलानेही त्यांच्या सुरक्षेची पुर्ण व्यवस्था करण्याची काळजी घेतली होती.'' असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असल्याचा गंभीर आरोप सुहास कांदेंनी केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.

"एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी म्हटलं होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com