फडणवीसांनी ठाकरेंना डिवचले; सौभाग्यवतींना 'राबडी देवी' म्हटल्यावर...

भाजपचे जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात ट्वीट करताना 'महाराष्ट्राची राबडी देवी' असे शब्द वापरले होते.
Devendra Fadnavis Statement on Rashmi Thackeray
Devendra Fadnavis Statement on Rashmi ThackeraySarkarnama

मुंबई : भाजपचे (Bjp) महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शिवेसनेने (ShivSena) याविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली होती. यानंतर मुंबई पोलिस क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने जितेन गजारिया यांना समन्स बजावले होते. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. (Devendra Fadnavis Statement on Rashmi Thackeray)

Devendra Fadnavis Statement on Rashmi Thackeray
शिवसेना जन्मायच्या आधी भाजपचा आमदार होता...

फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी भाजला सीबीआय आणि ईडी बाजूला ठेवून लझा असे म्हटले होते. यासंबधी बोलताना फडणवीस म्हणाले की, ''चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच. तुम्ही तर आम्ही एखादे ट्वीट केले तरी जेलमध्ये टाकता. राबडी देवी ही काय शिवी आहे का? मात्र, सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटले म्हणून पुण्याचे २५ पोलिस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरात जात आहेत. सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग जितका महाराष्ट्रात झाला, मला काळजी वाटते, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे. त्यामुळे हा रडीचा डाव आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. (Rashmi Thackeray News)

प्रकरण काय?

भाजपचे जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात ट्वीट करताना 'महाराष्ट्राची राबडी देवी' असे शब्द वापरले होते. गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला होता. हे ट्वीट गजारिया यांनी डिलीट केले होते.

Devendra Fadnavis Statement on Rashmi Thackeray
फडणवीसांनी नाना पटोलेंसाठी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!

दरम्यान, या वेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. शिवसेना २५ वर्ष युतीत सडली असो ते म्हणत आहेत. मात्र २०१२ पर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का, असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का असा सवाल आमच्या मनात येतो. भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते. आता भाजप सोडल्यावर चौथ्या क्रमंकावर गेले. मग कोणासोबत सडले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तेच ते मुद्दे आहेत. त्यांचे भाषण आता शिवसैनिकांना पाट झाले असेल. राम जन्मभूमिच्या आंदोलनात तुमचे कोण होते? भाषणाच्या पलिकडे तुमचे हिंदुत्व काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे. हिंदुत्व जगावे लागते, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com