मुंबईत जे घडतयं ते मुख्यमंत्र्यांच्याच इशाऱ्यावर ; फडणवीसांचा हल्लाबोल

हनुमान चालीसा महाराष्टात नाही तर पाकिस्तानमध्ये म्हणायचे का?
 Uddhav Thackeray, devendra fadnavis
Uddhav Thackeray, devendra fadnavissarkarnama

मुंबई : शिवसेनाविरुद्ध नवनीत राणा, किरीट सोमय्यांवर हल्ला, भोंग्याबाबतची भूमिका या मुद्यांवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (thackeray government) यांचा आज समाचार घेतला. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,केंद्रीयमंत्री नारायण राणे उपस्थित होते.

''सध्या मुंबईत जे सुरु आहे. ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्या इशारावर सुरु आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.खासदार नवनीत राणे यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार केला होता. हनुमान चालीसा महाराष्टात नाही तर पाकिस्तानमध्ये म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

 Uddhav Thackeray, devendra fadnavis
राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ 'मातोश्री' ; सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू

''मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्य हे हनुमान चालीसा म्हणणार होते, ते आंदोनल, किंवा हल्ला करणार नव्हते, त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू, आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यासाठी तयार आहे,'' असा इशारा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं

''मुख्यमंत्र्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, असे हल्ले करून आम्ही घाबरणार नाही, हे लक्षात ठेवावं. झेड सेक्युरिटीमधील आमच्या नेत्यांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारने विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ठरवलयं. जिथे गुन्हा नोंद करायला ही संघर्ष करावा लागत आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली नव्हती,'' असे फडणवीस म्हणाले.

 Uddhav Thackeray, devendra fadnavis
सोमय्यांवरील हल्ल्याची गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त ; ठाकरे सरकारची गंभीर दखल घेणार

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा

फडणवीस म्हणाले, ''भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारवर फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. ''पूर्वी नवरात्रीमध्ये आम्ही रात्रभर जागरण, भजन करायचो, पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा वाजेनंतर माईक चालणार नाही, असा निर्णय दिला.तो आम्ही मान्य केला. त्यामुळे भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे,''

भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल

''मोहित कंबोज यांच्यावर तर मॉब लिचिंगचा प्रयत्न करण्यात आला. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन भाजप नेत्यांवर धादांत खोटे गुन्हे दाखल करीत आहे. मात्र उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला,''असे फडणवीस म्हणाले.

पोलिसांचा दुरुपयोग

''आमच्या पोलखोल रथावर हल्ले झाले.आमच्या नेते, कार्यकर्त्यांना मारहाण झाली. हे केवळ मुंबईत नाही तर राज्यात सर्वत्र असे प्रकार सुरू आहेत.आमचा कार्यकर्ते दडपशाही सहन करीत असताना, पोलिसांचा दुरुपयोग होत आहे,'' असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com