ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हा शिंदेंच्या डोळ्यात पाणी आले होते, आता ते गद्दार ठरले ?

दीपक केसरकर यांनी ठाकरेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. केसकरांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर तोफ डागली.

deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray
deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeraysarkarnama

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना नेते यांच्यात दररोज 'सामना' रंगत आहे. एकनाथ शिंदेच्या (eknath shinde) बंडखोरीनंतर शिवसेनेतील (shiv sena) गळती अद्याप थांबलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) माजी मंत्री आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे आपल्या संपर्क यात्रेतून बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत. (deepak kesarkar latest news )

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. केसकरांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर तोफ डागली.

केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे आजारी असताना आम्ही बंड केलेले नाही. आदित्य ठाकरेंचं आव्हान पोकळ आहे. आम्हाला निवडून येण्याच्या धमक्या देतात, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आमच्या प्रादेशिक अस्मितेला डिवचू नका. आमचा अपमान करु नका, जनता पेटून उठेल,"

"आदित्य ठाकरे तरुण नेते आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा, त्यांच्याबाबत अजूनही आदर आहे, आम्ही आदराने बोलतो, त्यांनीही आदराने बोलावे. आम्हाला डिवचलं तर महागात पडेल," असा इशारा केसरकरांनी यावेळी ठाकरेंना दिला.

"शिवसेनेत आमदारांनी केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांचा अपमान करण्यात येत आहे. त्यांना गद्दार म्हटले जात आहे," असे केसकर म्हणाले.

तुम्हीदेखील आदराने बोला..

केसरकर म्हणाले, "कट्टर शिवसैनिकांमुळेच शिवसेना ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा अपमान करू नका. शिवसैनिक दूर गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी यात्रा सुरू केल्या आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही आदराने बोलतो. तुम्हीदेखील आदराने बोला,"

आमची शिवसेना खरी..

दीपक केसरकर म्हणाले, "तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली, कुठेही आपत्ती आली तर ते धावून गेले, ते आहेत म्हणून शिवसेनेची पाच वर्ष सत्ता आहे,"

म्हणून शिवसेना पाच वर्ष सत्तेत..

केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून शिवसेना पाच वर्ष सत्तेत राहू शकते.हिंदुत्वांच्या विचाराशी ठाम राहिलं पाहिजे, दिशाभूल करुन चालत नाही. उद्धवसाहेब बरे झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली होती, राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडा, असे त्यांनी ठाकरेंना सांगितलं होतं,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com