मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आज हल्लाबोल केला. केसरकर आज पत्रकारांशी बोलत होते. रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांवर केसरकरांनी टीकेचे बाण सोडले. (Deepak Kesarkar news update)
केसरकर म्हणाले, "रोज सकाळी नऊ वाजता कोण बोलतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते बोलत असताना ज्या पक्षासोबत आपण राज्य करतो. त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध राहिले पाहिजे. केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहिले पाहिजे. त्यामुळे राज्याचा गाडा चांगला राहू शकतो. लोकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. राज्य आणि राजकीय पक्ष हे जनतेसाठी असतात. कधीतरी राज्य आणि प्रगतीबद्दल बोला?, कितीकाळ राजकारण चाललं पाहिजे, याला सुद्धा मर्यादा आहेत," "प्रवक्त्यांच्या बोलण्यामध्ये जी सुधारणा झाली होती. ते पुन्हा एकदा घसरायला लागले आहेत. लोकांना रडवायचं कसं त्यांना माहित आहे," असे केसरकर म्हणाले.
"राज्याला शांतता पाहिजे आहे. ही शांतता लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे. राज्याला शांतता द्यायची की नाही, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका. शिवसैनिकांची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण म्हणून केले होते," असे केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेले आश्वासन पाळलं नाही. केंद्रांवर आरोप करीत आघाडी सरकारचे अडीच वर्ष गेली. आता तरी कोणी राजकारण करु नये. आम्हाला राजकारण नको,काम कारायचे आहे. महाराष्ट्राचा विकास थांबवू नका. महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे, रोज केंद्रावर आरोप करणे थांबले पाहिजे. महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकारण करू नये,"
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.