भाजप नेत्यानं मलिकांना आणलं अडचणीत! अखेर जामिनावर झाली सुटका

कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
NawabMalik and Mohit Kamboj
NawabMalik and Mohit Kamboj Sarkarnama

मुंबई : क्रूझवरील पार्टीवर अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (NCB) केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्यानंतर ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात अखेर मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मोहित कंबोज हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मलिक यांनी कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केल्याप्रकरणी त्यांनी हा खटला दाखल केला आहे. या खटल्यात अखेर माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याचबरोबर त्यांना 5 हजार रुपयांची हमीही भरण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 डिसेंबरला होणार आहे.

NawabMalik and Mohit Kamboj
चांदीवाल समितीचा दणका अन् परमबीरसिंह हाजिर हो!

मलिक यांच्या आरोपांवर बोलताना कंबोज म्हणाले होते की, मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे, असा आरोप माझ्यावर केला आहे. पण माझ्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही. मी दीड वर्षापासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे, याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावेत. आर्यन खानसोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत. नवाब मलिक खुर्चीचा गैरवापर करीत आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर मी शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

NawabMalik and Mohit Kamboj
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार बसले बूटपॉलिशला अन् म्हणाले...

मलिक यांनी कंबोज यांच्यावर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले? यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com