जामीन मिळाला पण राणेंना कणकवलीपासून लांबच राहावे लागणार

संतोष परब हल्ला प्रकरणात बुधवार जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन दिला.
Nitesh Rane
Nitesh Ranesarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असे असले तरी न्यायालयाने राणेंना हा जामीन देताना काही अटीही घातल्या आहेत.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला होता. पण न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राणेंना 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन दिला. त्यानुसार राणेंना या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Nitesh Rane News)

Nitesh Rane
राऊतांचं उपराष्ट्रपतींना चार पानी पत्र अन् त्यावर आदित्य ठाकरेंकडून एकच शब्द...

त्याचप्रमाणे तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. कणकवली तालुक्याबाहेर ज्याठिकाणी त्यांचे वास्तव्य असेल तिथला पत्ता द्यावा लागणार आहे. या अटी-शर्थींवर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला आहे.

राणेंना दोन तारखेला झाली होती अटक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. नितेश राणेंच्या जामिनावर 5 फेब्रवारीला पहिली सुनावणी होणार होती. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी 7 फेब्रुवारीला ठेवली होती. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे काल सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी झाली नव्हती. मंगळवारी राणेंच्या जामिनावर सुनावणी झाली. कालही युक्तीवाद पूर्ण झाला पण निकाल राखून ठेवण्यात आला होता.

Nitesh Rane
बिकिनी, घुंघट किंवा हिजाब...हा महिलांचा अधिकार; प्रियांका गांधींची वादात उडी

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com