'काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपला धडकी भरली!'

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा भाजपला टोला
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

मुंबई : देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो' यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष (BJP) बिथरला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

तसेच राहुल गांधी यांच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागत आहेत. यातूनच 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे. हे सिद्ध होत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजप महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. राहुलजी गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा सुरु करताच भाजपच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली. कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुल गांधी देश पिंजून काढत आहेत, असेही पटोले म्हणाले.

Rahul Gandhi
पेडणेकरांनी भाजपचा डाव उलटवला; फडणवीस अन् कोश्यारींचेही फोटो केले शेअर

१५० दिवस ३५०० किमीचा प्रवास व १२ राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपला भारत जोडो यात्रेची इतकी भिती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी थेट केंद्र सरकारला जाब विचारत असून जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत, हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येते.

Rahul Gandhi
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने प्रेयसीच्या भावाची केली हत्या

राहुल गांधी यांच्या टी शर्टची किंमत दाखवणाऱ्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तर १० लाखांचा सुट, १. ५ लाखांचा चष्मा, ८० हजाराची शाल, १२ लाखांची कार, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरातात आणि वरून मी फकिर आहे असा कांगवा करतात. असा फकिर आपल्या देशाला लाभला आहे याचे भान भाजपने तरी ठेवायला हवे. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चिंता करण्यापेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे, त्याची चिंता भाजपने करावी, अशा निशाणा पटोले यांनी भाजपवर साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com