
Mumbai News: मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
"पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या एका सहकाऱ्याने शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्सचा गैरव्यवहार केला. मग यामध्ये नेमकी कुणाचे पैसे आहेत. अदानी यांचे की अन्य कुणाचे ?, याची पंतप्रधान मोदींनी चौकशी केली पाहिजे", असा आरोप राहुल गांधींनी केला.
याचवेळी काही जातगिक वृत्तपत्रांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात राहुल गांधींनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. अदानी कुटुंबाने शेअरमध्ये पैसे गुंतवून मोठा गैरव्यवहार केला, तब्बल 1 बिलियन डॉलर्स अदानींच्या माध्यमातून दुसऱ्या देशात गेले आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
गौतम अदानी यांची एका प्रकरणात चौकशी झाली होती. त्यामध्ये त्यांना क्लिनचीट देण्यात आली. इतकच नाही अदानी यांची चौकशी करणाऱ्या संबधित अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी देण्यात आली. त्यामुळे त्यांची जी चौकशी झाली, ती संशयास्पद आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. मात्र, या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, पंतप्रधान या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.