सत्तांतर होताना, बंदूक काँग्रेसच्या खांद्यावर ठेवायला नको होती...

एकनाथ शिंदे eknath Shinde हे कायम गर्दीमध्ये राहणारे व्यक्तिमत्व आहे. असे व्यक्तीमत्व आज मुख्यमंत्रीपदावर CM Post पोहोचले आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तेत बदल करताना इतिहास निर्माण होतो. पण, आपण इतिहास काय लिहितो हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. कोण सुरतला गेले, कोण गुवाहटीला गेले, कोण गोव्याला गेले हे लक्षात घेतले होते. हे सगळे होत असताना बंदूक मात्र, आमच्या खांद्यावर ठेवली होती. ती ठेवायला नको होती. सरकार कसे आले, कोण किती बोलले, कोणावर दबाव आला, हे सर्वांना माहिती आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्यातील एक तरूण कार्यकर्ता जो रोज जीवनाचा संघर्ष करत होता. तो संघर्ष करत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आहे. लोकशाही व राज्य घटनेने आपल्याला काय दिले असेल तर सर्वसामान्य व्यक्तीमत्वाला सर्वोच्च स्थानावर पोहोचवले आहे. म्हणून राज्य घटना आपल्या सर्वांच्या आदराच्या स्थानी व प्राणापेक्षाही श्रेष्ठ आहे. एकनाथ शिंदे हे कायम गर्दीमध्ये राहणारे व्यक्तिमत्व आहे. असे व्यक्तीमत्व आज मुख्यमंत्रीपदावर पोहोचले आहे.``

Balasaheb Thorat
जाणून घ्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास...

फडणवीसांची दिल्लीवाले काळजी करतात..

``देवेंद्रजी तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. त्याचाही आनंद आहे. पण ते नेहमी म्हणत होते. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार... ते खरंच झाले. पण ते असेही येणार, असे वाटले नव्हते. हे मात्र, तुम्ही सांगितले नव्हते. कोल्हपूरच्या सभेत मी त्यांना म्हणालो होतो, तुमच्या पक्षाला विरोधी पक्ष नेता पाहिजे होता, त्यासाठी आरशापुढे उभे राहा आणि ते खरेच झाले. तुमचे व्यक्तिमत्व चांगले असून काम ही चांगले करता. पण हे चांगले कामच तुम्हाला अडचणीत आणतंय. दिल्लीवाले तुमची खूप काळजी करतात काय, अशी शंका आता महाराष्ट्राला येत आहे. तुमच्याकडून आता चांगल्या कामाची अपेक्षा करतो.

Balasaheb Thorat
फडणवीस यांचा नेहमीचा जोश त्यांच्या भाषणात नव्हता : अजित पवारांची टोलेबाजी

आम्ही खूप सरकारे पाहिली आहे. एका पक्षाचे सरकार असले तरी कुरबुरी असतात. याकडे लक्ष द्या, असा सल्लाही थोरात यांनी दिला. एकनाथ शिंदे हे १६ ते १८ तास काम करतात. ही चांगली गोष्ट आहे. पण अलिकडच्या काळात दबाव वाढला असून तो कामासाठी आहे. आपापसांत तणाव निर्माण होतात. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या सगळ्या परिस्थितीत तणाव होता, संयमाने तोंड देत होतो. टोकाची भूमिका कधीही घेतली नाही.

Balasaheb Thorat
रामशास्त्री आता जागा झाला; बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांचा टोला

इतिहास काय लिहितो हे सुध्दा लक्षात ठेवले पाहिजे. कोण सुरतला गेले, कोण गुवाहटीला गेले, कोण गोव्याला गेले हे लक्षात घेतले होते. सगळे होत असताना बंदुक मात्र, आमच्या खांद्यावर ठेवली होती. ती ठेवायला नको होती. सरकार कसे आले, किती बोलले, कोणावर दबाव आले, हे सर्वांनना माहिती आहे. काहीही असु देत. मी आता मागे फार जात नाही, आता चांगल्या कामाची अपेक्षा या सरकारकडून आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com