संभाजीराजे छत्रपती खासदार झाले नाहीत हे दुर्देवी; काँग्रेसचा त्यांना पाठिंबा : नाना पटोले

Sambhajiraje Chhatrapati : नाना पटोलेंनी जाहीर केली काँग्रेसची भूमिका
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबतची घोषणा केली. दरम्यान ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी या सगळ्या घडामोडींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार ठरले आहे. तसेच त्यांच्यावर दिलेला शब्द मोडला असल्याचा गंभीर आरोपही केले. (Sambhajiraje chhtrapati latest News)

संभाजीराजेंच्या या भूमिकेमुळे शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना माणणाऱ्या समर्थकांमध्ये आणि संघटनांमध्ये व्हिलन ठरली आहे. असे असतानाच दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मात्र त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी आहे, परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील, असे म्हणतं नाना पटोले यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, इतर पक्षांचे माहित नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावे अशी कॉंग्रेसची मनापासूनची इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिबा राहिलं, असे म्हणतं नाना पटोले यांनी माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे घोषित केले.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती :

राज्यसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मी मुंबईत आलो. माझी बोलायची मुळीच इच्छा नाही. माझ्या रक्तात, तत्वात ते नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठलंही स्मारक, पुतळा असेल तर दोघांनी तिथं जायचं. जर संभाजीराजे छत्रपती खोटं बोलत असेल तर सांगावं. (Sambhajiraje Chhatrapati not contesting Rajya Sabha Election)

मी मुंबईत आल्यानंतर ओबेरॉयमध्ये दोन मंत्री पाठविले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. पण मी नकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. वर्षावर आलात तर चर्चा करू शकतो. मीही त्यांचा मान राखत त्यांना भेटायला गेलो. तीन मुद्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा शिवसेनेत प्रवेश करा. माझ्याकडील एक प्रस्ताव त्यांना सांगितला. शिवसेनेची सीट असली तरी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवारी द्या. पण त्यांनी हे शक्य नाही, असं सांगितलं. मग त्यांनी आघाडीच्यावतीने शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यास तयारी दर्शवली. पण त्यासही मी नकार दिला. दोघांनाही दोन दिवस विचार करण्याचं ठरलं. पण दोन दिवसांनी त्यांच्याकडून निरोप आला. सुवर्णमध्य काढू, असा निरोप आल्याचे छत्रपतींनी सांगितले.

आमची मंत्र्यांच्या घरी बैठक झाली. मी आणि मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार ड्राफ्ट तयार झाला. मंत्र्यांचे हस्तलिखित आहे. ओबेरॉय हॉटेलमध्ये एक मंत्री, एक खासदार, त्यांचे स्नेही यांच्या मीटिंग ठरली. बैठकीआधी त्यांनी सांगितले, आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. पण मंत्री आणि खासदारांनी ड्राफ्टनुसार पुढे जाऊ असे सांगितले. ड्राफ्ट फायनल असल्याचे सांगत ते निघून गेल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

एवढा शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरात गेलो. कागदपत्रांची तयारी करण्यासाठी निघालो. कोल्हापूरात गेल्यानंतर समजले संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. जे खासदार बैठकीत होते, त्यांना फोन केला पण ते काहीही बोलू शकले नाहीत. मुख्यमत्र्यांना फोन केला, पण त्यांनी फोन घेतला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हतो. त्यांनी दिलेला शब्द मोडला, अशी नाराजी छत्रपतींनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com