मुंबई, कोकणातल्या निवडणुका लांबणार; इतर पालिका, झेडपीच्या निवडणुका जून-जुलैमध्येच

पावसाळ्यात निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शविली होती.
Supreme Court OBC Reservation Latest News
Supreme Court OBC Reservation Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आयोगाला पावसाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात आयोगाला जुन-जुलैमध्येच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. (Maharshtra Latest Marathi News)

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा आयोगाकडून न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने आयोगाला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रम बदल करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. (Supreme court local bodies election in Maharashtra)

Supreme Court OBC Reservation Latest News
'ईडी'कडून भाच्याची चौकशी सुरू असताना मुख्यमंत्र्यांना करावी लागणार अधिकाऱ्यांची सुरक्षा

राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला. त्यामुळे आयोगाकडून आता जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार केला जाऊ शकतो. राज्यात मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तिथल्या निवडणुका आयोग घेणार नाही, अशी शक्यता आहे.

त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस कोसळतो. अनेक ठिकाणी पुरस्थिती असते. तिथेही निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ व मराठवाड्यात तुलनेने पाऊस कमी असतो. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे. आता आयोग निवडणुकांचा कार्यक्रम कसा तयार करणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

Supreme Court OBC Reservation Latest News
शिवसेनेला मोठा धक्का; शाम देशपांडेंचा पक्षाला जय महाराष्ट्र!

राज्यात १५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २१० नगरपंचायती, १९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इतक्या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान २ ते ३ टप्प्यांत घ्याव्या लागतील आणि ६ आठवडे चालतील. पावसाळ्यात निवडणूक झाल्यास राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती असते. राज्य कर्मचारी पूर नियंत्रणाच्या कामात व्यग्र असतात. या काळात सामानाची वाहतूक करणेही अवघड होऊन बसते. पावसाळ्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com