घडामोडींना वेग : मुख्यमंत्री ठाकरे अचानक उच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या भेटीला

Uddhav Thackeray | Bombay High Court : मनपा, ZP निवडणुकांवर तोडगा निघणार?
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींच्या दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई अचानक उच्च न्यायालयात जाणार आहेत. संध्याकाळी साडे चार वाजता ते उच्च न्यायालयात जावून मुख्य न्यायामुर्ती दिपंकर दत्ता आणि इतर न्यायमुर्तींची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील काही मंत्री देखील सोबत असण्याची शक्यता आहे. या भेटीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरीही सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ निवडणुका घेण्याच्या दिलेल्या निकालाबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (local body elections) सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याची भूमिका आयोगाने घेतली होती. पण त्यानंतरही न्यायालयाने (Supreme Court) हा आदेश दिल्याने आयोगासह राज्य सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत.

Uddhav Thackeray
राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यात ठाकरे सरकार अडचणीत : न्यायालयाने फटकारले

मात्र ओबीसी आरक्षण (Obc Reservation) शिवाय निवडणुका न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठीचा ठराव देखील विधीमंडळाने एकमुखाने केला आहे. शिवाय प्रभाग रचना आणि इतर अधिकार राज्य सरकारने कायदा करुन स्वतःकडे घेतले आहेत. त्यानंतर अनेक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपल्याने तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यावर आक्षेप घेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी प्रशासक नेमणे घटनाबाह्य असल्याची याचिका करण्यात आली होती.

Uddhav Thackeray
काँग्रेस प्रवेशाची ऑफर : संभाजीराजेंनी घेतला मोठा निर्णय; १२ मे रोजी करणार घोषणा

याशिवाय राज्यात सध्या सुरु असलेल्या मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा या वादावर तोडगा काढण्यासाठी देखील या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपने मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी हनुमान चालिसा आंदोलनाची घोषणा केली आहे. तर ठाकरे सरकार केवळ एकाच धर्मांबाबत निर्णय घेता येणार नसल्याचे सांगत भोंगे हटवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com