मुंबई : शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांशी आज संवाद साधला. शिवसेनेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजाळा दिला. मोदी सरकार, अग्निपथ योजनेवर त्यांनी हल्लाबोल केला. (CM Uddhav Thackeray on Shiv Sena Vardhapan Din)
उद्धव ठाकरे म्हणाले, "माझा पक्ष हा पितृपक्षच आहे, कारण तो माझ्या पित्याने स्थापन केला आहे. शिवसेना स्थापनेच्या वेळी माझे वय सहा वर्ष होतं. आज शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. स्थापनेपासून शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहणार,"
"गेल्या 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन. सळसळत्या रक्ताचं सैनिक दररोज येत आहेत. भूमिपूत्राच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
"गर्व से कहो हम हिंदु है" ही घोषणा विश्व हिंदु परिषदेची होती.पण शिवसेनेने ही घोषणा प्रत्यक्षात आणली. "ह्दयात राम आणि हातात काम," असे शिवसेनेचं हिंदुत्व आहे," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अग्निपथ योजनेवरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, "भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे," असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "नोकरीचे आमिष दाखविणारे हे सरकार आहे, तरुणांवर ही वेळ कोणी आणली, अग्निपथ योजनेवरुन तरुणाची माथी कोणी भडकवली," असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. 'ही योजना मृगजळ आहे,' असे ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.