एकनाथ शिंदे म्हणाले, मी एकटा मुख्यमंत्री नाही...;

CM Eknath Shinde| शिवसेना भाजपा युतीचे सरकार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आहे
CM Eknath Shinde|
CM Eknath Shinde|

डोंबिवली : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांचं सगळ्यांचं सरकार आहे. मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रात्री साडे अकरा सुमारास उपस्थिती लावत उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपळास ते मोठागाव असा बोटीने प्रवास करून आणि डोंबिवलीची खाडी पार करून दीपेश म्हात्रे यांच्या हंडीला आले. यावेळी माजी महापौर पुडलीक म्हात्रे आणि शहरप्रमुख राजेश मोरे पण उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री डोंबिवली पश्चिमेतील हंडीला हजेरी लावत कार्यकर्त्यांची आणि उपस्थित नागरिकांची मने जिंकली विशेष म्हणजे त्यांनी भिवंडी येथील पिंपळास ते डोंबिवली पश्चिम येथील मोठा येथे खाडी प्रवास केला आणि सम्राट चौकातील हंडीला हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला.

CM Eknath Shinde|
Nashik News: टोलसाठी पोलिस अधीक्षकांचा ताफाच अडवला!

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार तुमच्या सगळ्यांच सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, शिवसेना भाजपा युतीचे सरकार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा सरकार आहे, म्हणून प्रत्येकाला वाटते हे माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे. हीच बाब गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळत असून अनुभवला मिळत आहे, ही चांगली बाब आहे. सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांचं सगळ्यांचं सरकार आहे, मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात.

आपण या गोविंदा मध्ये निर्णय घेतला असून दहा लाखाचा विम्याची घोषणा सरकारने केली. त्याचबरोबर पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुरू होणार यावर्षी आपण सार्वजनिक सुट्टी पण जाहीर केली होती. कुठलाही गोविंदला इजा झाली, दुखापत झाली, अपघात झाला तर त्याच्या संपूर्ण खर्च सरकार विनामूल्य ट्रीटमेंट करणारा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी येण्यासाठी बोटीने प्रवास करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावचं लागतं.

यावेळी माजी नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे म्हणाले की, सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा, हे आज मुख्यमंत्री साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कार्यकर्त्यांची मनं जपण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्याही थराला जाऊ शकतात. कार्यकर्त्यांच आणि गोविंदा पथकांच मन जपण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज डोंबिवलीत हजेरी लावली. खूप कष्ट करणारे सर्व सामांन्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com