'आम्ही आता दिशा ठरवली' : केसीआर यांच्या भेटीनंतर ठाकरेंचा भाजपला स्पष्ट इशारा!

तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आज (ता.२०) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली.
K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeray
K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आज (ता.२०) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतो. अनेक दिवसांपासून भेट होणार, होणार असे बोलले जात होते. त्यानंतर आज हा दिवस उजाडला. आम्ही भेटही काही असी नाही की आत एक बोलायचे आणि बाहेर एक बोलायचे असे नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) टोला लगावला. दिवसागणीत देशातील राजकारण गढूळ होत चालले आहे. देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे हिंदूत्व असे नाही, त्यामध्ये सुड भावना नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeray
के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा; भाजपला घेरणार?

राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान कोणीही होईल. मात्र, सुडाचे राजकारण नको. देशाचाही विचार झाला पाहिजे असेही ठाकरे म्हणाले. तो विचार आम्ही करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशामध्ये राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. राज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे. हे राजकारण देशाला परवडणारे नाही. एका नव्या विचारांची सुरुवात झाली आहे. त्याला आकार उकार यायला वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

आम्ही काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय केले नाही हे खोट्या पद्धतीने सांगणे सुरु आहे, आम्ही आता दिशा ठरवली आहे. त्यामध्ये जसजसी प्रगती होईल तसे आपल्यासा सांगितले जाईल. पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला वेगळे ठेऊन दिसऱ्या आघाडीची भूमिका मांडली आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, के. चंद्रशेखर राव म्हणाले, आज एक सुरुवात झाली आहे. देशातील इतर नेत्यांशीही आम्ही बोलणार आहोत.

K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeray
महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो; मुख्यमंत्री केसीआर

तसेच त्यांनी यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवही भाष्य केले. ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणाचा चुकीचा वापर सुरु आहे. ही चुकीची गोष्ट आहे. केंद्र सरकारने निती बदलावी अन्यथा त्यांना त्याचे परिनाम भोगावे लागतील, असा स्पष्ट ईशाराही राव यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com