Shinde Group Ayodhya Visit: मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला अब्दुल सत्तार, बच्चू कडूंची दांडी; कारण काय? चर्चांना उधाण

Abdul Sattar, Bachu Kadu's Absense Ayodhya Tour: बच्चू कडू, अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री शिंदेंबरोबर अयोध्याला न जाण्याचे कारण काय?
Abdul Sattar and Bachchu Kadu
Abdul Sattar and Bachchu Kadu Sarkarnama

Shivsena News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार, खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्या दौऱ्यावर गेले. शिंदे-फडणवीसांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आले. या अयोध्या दौऱ्याची राज्यात चांगली चर्चाही सुरू आहे.

पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला जाणारे अब्दुल सत्तार, बच्चू कडू आणि शहाजीबापू पाटील या अयोध्या दौऱ्यात मात्र दिसले नाहीत. त्यामुळे गुवाहाटी दौरा गाजवणारे या अयोध्या दौऱ्याला का गेले नाहीत? ते नाराज तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Abdul Sattar and Bachchu Kadu
Ambadas Danve On Shinde: मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात ठाण्यातील कुख्यात गुंड? अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

एवढंच नव्हे तर शिवसेनेचे (शिंदे गट) हे तीन आमदार अयोध्या दौऱ्यादरम्यान गैरहजर राहिल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सूलट चर्चांही सुरू झाली आहे. आता या पार्श्वभूमीवरच अब्दुल सत्तार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तर शहाजीबापू पाटील हे अयोध्येला न जाण्याचे कारण समोर आले आहे.

अब्दुल सत्तार का गेले नाहीत?

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात कृषीमंत्री सत्तार हे गैरहजर दिसले. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, ''मी राम भक्तच आहे. पण शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी मी दौरा काढला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे देखील रामाचंच काम आहे. त्यामुळे मी अयोध्येला गेलो नाही'', असं सत्तार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Abdul Sattar and Bachchu Kadu
Ambadas Danve On Ayodhya News : काय हा `फडतूसपणा` ? विमानातून गुंड अयोध्येत पवित्र करायला नेला का ?

शहाजीबापू पाटलांची अडचण काय?

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात गुवाहाटी गाजवणारे आमदार शहाजीबापू पाटील हे गैरहजर होते. त्यामुळे ते अयोध्येला का गेले नाहीत? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, काही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे शहाजीबापू पाटील हे अयोध्या दौऱ्यावर गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

बच्चू कडू अयोध्येला न जाण्याचं काय कारण ?

आमदार बच्चू कडू यांनीही अयोध्या दौऱ्याला दांडी मारली. त्यामुळे बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सुरू झाली. बच्चू कडू हे अयोध्या दौऱ्याला न जाण्यामागे नेमकी काय कारण आहे? हे मात्र, समजू शकले नाही. त्यामुळे त्यांचे अयोध्येला न जाण्याचे कारण काय? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com