Abu Azami News: महाराष्ट्राचं नाव बदला : आमदार अबू आझमींची मागणी! "रायगड नावालाही काही अर्थ नाही.."
Maharashtra Politics : समाजवादी पक्षाचे नेत व आमदार अबू आझमी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. राज्यातल्या एखाद्या जिल्ह्याचे नाव बदलण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचं नाव बदलण्याचे त्यांनी विधान केले आहे. आझमी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं कर्तुत्व उत्तुंग आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या जिल्ह्यांचे नाव बदलण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं नाव बदलण्यात यावं. महाराष्ट्र राज्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावं. मग आम्ही टाळ्या वाजवू.
अबू आझमी पुढे म्हणाले, "ठाणे जिल्ह्याचंही खरंतर बदलायला पाहिजे. नवी मुंबई जिल्ह्याचंही नाव बदलण्यात यावं. ऱायगड नावालाही काही अर्थ नाही, ते हा बदलण्यात यावं. केवळ मुस्लीमांशी संबंधित नावात बदल करणे, नामांतर करणे, हे फक्त निवडणुकींसाठी केलेले ध्रुवीकरणाचा डाव आहे. सत्ताधारी हे ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहेत.
मुस्लिमांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर :
मुस्लीम समूह हा इतर कोणत्याही समुदायापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो आणि करत आलाय. शिवाजी महाराजांनी आपल्या कालखंडात मुस्लिम समाजासाठी खूप काही केले आहे. शिवरायांच्या काळात वकील, सैनिक अशा सगळ्याच गोष्टींमध्ये मुस्लिमांचा मोठा वावर होता. शिवरायांची लढाई धार्मिक नव्हती, धर्मासाठी नव्हती, तर सत्तेची लढाई होती.
तेव्हाच्या राजा, महाराजांना धर्म या गोष्टीशी कोहीही देणेघेणे नव्हतेच. ते फक्त सत्ता, साम्राज्याचा विस्तार यासाठी राज्या राज्यात युद्ध करायचे. त्यामुळे इतिहासातील कोणत्या युद्धामध्ये कोण जिंकला आणि कुणाचा पराभव झाला, याबाबत आता राजकारण करणे चुकीचे आहे, असेही आझमी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.