नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, माझीच भूमिका अधिकृत

Chandrakant Patil| Maharashtra Politics| काही महत्त्वाच्या कामासाठी फडणवीस दिल्लीला जात असतात. पण सत्ता बदलाबाबत मला काहीही माहित नाही.
Chandrakant Patil News, Maharashtra Political crisis News Updates,  Narayan Rane News
Chandrakant Patil News, Maharashtra Political crisis News Updates, Narayan Rane News

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) रुटीन कामासाठी दिल्लीला गेले. काही महत्त्वाच्या कामासाठी फडणवीस दिल्लीला जात असतात. पण सत्ता बदलाबाबत मला काहीही माहित नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आम्हाल माहिती नाही. अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. (Chandrkant Patil On Eknath Shinde)

आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमची 13 जणांची कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political crisis News Updates)

Chandrakant Patil News, Maharashtra Political crisis News Updates,  Narayan Rane News
Google Trend : ३३ देशात शिंदे टॅापवर ; देशात ठाकरे, फडणवीस, पवारांनाही मागे टाकलं

याच वेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्याबाबत नारायण राणे नक्की काय म्हणाले, याबाबत अजून तरी मला काही माहित नाही. पण महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मीच मांडत असतो. पण असे असले तरीही आमच्या सर्व नेत्यांना नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत.

त्यानंतर त्यांना भाजपचा या घडामोडींशी संबंध नाही, मग भाजप नेते मोहित कंबोज बंडखोर आमदारांसोबत का आहेत, असा सवाल विचारला असता पाटील म्हणाले की, ''मोहीत कंबोज एकनाथ शिंदेंचा चांगला मित्र आहे. पण मोहित कंबोज गुवाहाटीला गेल्याचे मला माहित नाही.कदाचित एकनाथ शिंदेंनीच त्याला बोलवून घेतलं असावं. आता संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचंय ते मला माहिती नाही. ते सकाळी एक बोलतात दुपारी काही दुसरचं बोलत असतात.''

राज्यात नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीतील विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे. दूरदूरचे लोक देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी येत आहेत. आमच्या सोबत असलेल्या अपक्ष आमदारांवर विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आणल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. राज्यामध्ये ज्या घडामोडींबाबत आपल्याला काहीच माहित नाही. या गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे, असे सांगत त्यांनी या घडामोडींबाबत तटस्थ भूमिका घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com