राज्यसभेच्या चाव्या ठाकूरांच्या हाती! 'बविआ'च्या तीन आमदारांची मतं ठरणार निर्णायक

बहुजन विकास आघाडीनं वाढवलं भाजप अन् महाविकास आघाडीचं टेन्शन
Hitendra Thakur
Hitendra Thakur Sarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उद्या (ता.१०) मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण महाविकास आघाडीला दोन मते कमी पडणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. यामुळे आता राज्यसभेच्या मतदानाचा कोटाही बदलला आहे. आता या निवडणुकीच्या चाव्या बहुजन विकास आघाडीकडे (बविआ) गेल्या आहेत. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली आहेत. यामुळे मतांचा कोटा होणार आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या चाव्या आता बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेल्या आहेत. ठाकूर यांचे तीन आमदार असून, त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. यातच ठाकूर यांनी आपल्या आमदारांना शेवटच्या क्षणी मतदान करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं हे आमदार कुणाच्या पारड्याच वजन टाकणार हे स्पष्ट झालेलं नाही.

ठाकूर यांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाकूर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. याचबरोबर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. यानंतर शिवसेनेचे नेतेही ठाकूर यांना भेटले होते. ठाकूर आणि शिवसेनेचे संबंध आधीपासून ताणलेले आहेत. त्यामुळे पवारांची शिष्टाई कितपत यशस्वी होते, हे उद्याच स्पष्ट होईल.

देशमुख आणि मलिक यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतांचा कोटा कमी झाली आहे. या आधी ४१. १४ चा मतांचा कोटा होता. आता ४०. ७१ चा मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे भाजपला १ मता फायदा होणार आहे. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज होती. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज लागणार आहे. यामुळे शिवसेनाला १ मलाताचा तोटा सहन करावा लागणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या आणि भाजपच्या तिसऱ्या उमेदवारासाठी एक-एक मत महत्त्वाचे असताना महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे.

Hitendra Thakur
वादग्रस्त भाजप नेत्यांना अजित दोवाल शिकवणार धडा! इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिला शब्द

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या देशमुख आणि मलिक कारागृहात आहेत. दोघांनी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्याला ईडीने विरोध केला. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर काल (ता.८) सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.

Hitendra Thakur
पंकजा मुंडेंना डावलताच कार्यकर्ते आक्रमक! थेट भाजप कार्यालयावर धडकले

महाविकास आघाडीची दोन मते कमी झाल्याने त्यांचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मलिक आणि देशमुख राज्यसभा मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी करू शकतात पण इतक्या कमी वेळात सुनावणी होऊन निकालाची शक्यता कमी असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते याबाबत उच्च न्यायालयात जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com