रावणाचा जीव बेबींत, यांचा जीव मुंबईत ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

''राज्यपाल हे संविधनिक पद आहे, हे विरोधकांना चांगले माहित आहे,'' असा टोला त्यांनी लगावला.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session)विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला काल धारेवर धरलं होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray)यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी विरोधकांनी महाविकास आघाडीवर केलेले अनेक गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले. फडणवीसांनी काल सादर केलेल्या कवितेवरुन मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बोलू दिले नाही, याबाबत ठाकरेंनी यावेळी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ''राज्यपालांनी भाषणाला सुरवात केली, पण विरोधकांनी त्यांच ऐकून घेतलं नाही. विरोधक हे फक्त तक्रारी करण्यासाठी राज्यपालांकडे जात असतात. राज्यपालाचं भाषण ऐकले नाही, मग सुधारकांचे कोण ऐकणार? चांगली कामे विरोधी पक्षाला दिसत नाही,'' ''राज्यपाल हे संविधनिक पद आहे, हे विरोधकांना चांगले माहित आहे,'' असा टोला त्यांनी लगावला.

 Uddhav Thackeray
बिबट सफारीवरुन जुन्नरमध्ये आजी-माजी आमदारांच्या डरकाळ्या

''मी जन्माने मुंबईकर, मला मुंबईचा अभिमान आहे. पण काही जण महाराष्ट्राची बदनामी करतात, महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून संबोधलं गेले. दारु विक्री देशात सर्वात कमी दुकाने महाराष्ट्रात आहेत, उत्तर प्रदेश, कर्नाटकात सर्वात जास्त दारुची दुकाने आहेत,'' असे सांगून मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

''देशात सत्ता आली तरी यांचा जीव मुंबईत, रावणाचा जीव हा बेबींत होता तसा यांचा जीव मुंबईत आहे. मी जन्माने मुंबईकर, मला मुंबईचा अभिमान आहे,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

 Uddhav Thackeray
ठाकरे सरकारचा युटर्न ; आमदारांना मोफत घर नाही, आव्हाडांचे स्पष्टीकरण

''महाराष्ट्र-कर्नाटक वादात केंद्र सरकार कुणाची बाजू घेत आहे, हे सर्वांना माहित आहे. नुसते आरोप करुन सरकार चालत नाही, काही जणांना आरशात बघितलं तरीही भष्ट्राचार दिसतो,'' असे ठाकरे म्हणाले.

सरकारने कोरोनाच्या कामाचा आढावा घेतला, ठाकरे म्हणाले, ''कोरोना काळात आम्ही शिवभोजन सुरू केलं. दहा रुपयात जेवण देतो ही अभिमानाची गोष्ट आहे. हे मोठं काम आहे. आजपर्यंत 8 कोटी पेक्षा अधिक थाळ्यांचं वाटप केलं. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर 500 कोटी तरतूद केली आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com