विद्यार्थ्याला असं तुरुंगात ठेवणं पवारांनाही आवडणार नाही! उच्च न्यायालयाचे खडे बोल

निखिल भामरे प्रकरणात न्यायालयाकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
Mumbai High Court Latest Marathi News
Mumbai High Court Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक येथील निखिल भामरे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आपल्याविरुध्दचा गुन्हा रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. (Mumbai High Court Latest Marathi News)

सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. दररोज हजारो ट्विट असतात. त्यातील प्रत्येक ट्विटची तुम्ही दखल घेणार का, असा सवाल न्यायालयाने केला. अशाप्रकारे एफआयआर दाखल करून विद्यार्थ्यांना तुरुंगात डांबणे, आम्हाला नको आहे, असं न्यायालय म्हणाले.

Mumbai High Court Latest Marathi News
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार का? शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं...

भामरे या ट्विट वाचून न्यायालयाने गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिसांना खडे बोल सुनावले. ट्विटमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही आणि एखाद्याला त्याआधारे महिनाभर तुरूंगात ठेवले जाते, हे कशाच्या आधार आहे, असं न्यायमूर्ती शिंदे यांनी सुनावलं.

सध्याच्या प्रकरणात आरोपीला अटक करून तुरुंगात डांबल्यामुळे शरद पवारांचीच प्रतिमा मलिन होईल, असंही न्यायालय म्हणाले. अशाप्रकारे तुम्ही कारवाई करायला लागला तर दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच प्रतिष्ठा कमी होईल. अशा मोठ्या लोकांनाही (शरद पवार) विद्यार्थ्याला तुरुंगात ठेवणं आवडणार नाही. प्रतिष्ठित लोकांची प्रतिमा मलिन झालेले आम्हाला चालणार नाही, असंही न्यायालय म्हणाले.

Mumbai High Court Latest Marathi News
श्रीधर नाईक खून खटला राणेंच्या जुन्या सहकाऱ्यानेच उकरून काढला!

सुनावणीच्या शेवटी न्यायालयाने सरकारी वकिलांना राज्याच्या गृह मंत्रालयाकडून भामरे याची सुटका करण्याबाबत कोणतीही हरकत नसल्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. याबाबत न्यायालय आग्रही असल्याचेही यावेळी दिसून आले. आता यावर 16 जून रोजी सुनावणी होणार आहे. केतकी चितळे प्रकरणातही यावेळी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची` या आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रीन शॅाट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jeetendra Awhad) यांनी शेअर केला होता. पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतल्यानंतर, निखिल भामरे हा युवक पोलिसांच्या (Police) हाती लागला आहे. आव्हाडांनीही कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर भामरे याला पोलिसांनी अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com