Uddhav Thackeray| Election Commission
Uddhav Thackeray| Election Commission Sarkarnama

Maharashtra Politics : निवडणूक आयोग बरखास्त करा या ठाकरेंच्या मागणीला भाजप खासदाराचा पाठिंबा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली होती

Subramanian Swamy Supprot Uddhav Thackeray's Demand : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आयोगाच्या कामकाजावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली होती. आता ठाकरे यांच्या या मागणीला भाजप खासदारानेच पाठिंबा दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. आता ठाकरेंना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठींबा दिलाय. निवडणूक आयुक्तांचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद असल्याचं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यासंबधी त्यांनी ट्विटदेखील केलं आहे. "मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण अर्थमंत्रालयात त्यांचा कार्यकाळ संशयास्पद होता.'' असे ट्विट स्वामी यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray| Election Commission
Thackeray On Election Commission : ठाकरेंची मोठी मागणी : निवडणूक आयोग बरखास्त करा

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी आयोगाच्या बरखास्तीची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरेंनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आम्ही शपथपत्र सादर केली हेाती. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. आयोगानेच त्यात असत्य असं काहीच नाही, असे पत्रही आम्हाला पाठविले. भरपावसात आम्ही पदााधिकाऱ्यांची शपथपत्रे दाखल केली, त्यानंतरही आयोगाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवर शिवसेनेसंदर्भात निर्णय दिला. पण, हे लोक पात्र आहेत की अपात्र याचा निर्णय अगोदर व्हायला पाहिजे होता, पण त्याआधीच आयोगाने निर्णय दिला.

आयागोला लोकप्रतिनिधींचा निकष लावायचा होता, तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली. आमच्याकडून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रं का घेतली. शिवसेनेच्या कार्यकारिणी सभेचा तपशील दिला नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले. पण आम्ही तर सीडीसुद्धा दिली होती. त्यावर आयोगाचं म्हणणं असं आहे की, कव्हरिंग लेटरमध्ये काही लिहिलेले नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

तसेच, निवडणूक आयोगाचा हा निकाल मी मानायला तयार नाही. परवा अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले आणि म्हणाले की, भाजप-शिवसेनेची युती. ती ही युती नाही. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. जे शिवधनुष्य रावणाला पेललं नाही, ते मिंद्यांना काय पेलणार आहे. त्यांना ते पेलणंच शक्य नाही. त्यांच्या मागे शिवसेना संपविण्याचा जो कट असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com