
मुंबई : हनुमान चालिसा (hanuman chalisa row) वाचून गरीबीचा व उपासमारीचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका करणाऱ्यांना देशातील गरिबी आणि उपासमारीचा प्रश्न सोडविण्यापासून गेल्या ७० वर्षांत कोणी अडवले होते, असा सवाल मुंबई भाजप (BJP) महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Desai) यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेसकडून (Congress) सातत्याने होत असलेल्या या टीकेला देसाई यांनी उत्तर दिले आहे. देसाई म्हणाल्या, अशी टीका करणाऱ्यांचे पूर्वसुरी गेली सत्तर वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेवर होते. २०१४ पूर्वी पंधरा वर्षे महाराष्ट्रात याच पक्षांचे सरकार सत्तारुढ होते. मात्र, त्यांनी गरीबांचे प्रश्न सोडविण्यावर अजिबात लक्ष दिले नाही. त्याचमुळे आजदेखील ही मंडळी उपासमारीचा प्रश्न सुटेल का? असे धाय मोकलून रडत आहेत, असा टोलाही देसाई यांनी लगावला.
उपासमारीच्या प्रश्नावर गळे काढणाऱ्या पक्षांचे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ज्या वेगाने तुरुंगात जात आहेत व सुपात असलेल्या उरलेल्यांवर जे आरोप होत आहेत ते पाहता या मंडळींचे गेल्या सत्तर वर्षांतील प्राधान्यक्रम काय होते, हे सहज कळून येते. केवळ आपली मतपेढी जपण्यासाठी ही मंडळी अशी वक्तव्ये करीत आहेत. मात्र त्यांना कोणत्याही समाजघटकाबाबत कसलेही प्रेम नाही, असलेच तर ते पूतनामावशीचे प्रेम आहे, अशा शब्दात देसाई यांनी हल्लाबोल केला. सर्व समाजघटकांचे हित पाहणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केवळ विशिष्ट घटकांचे लांगूलचालन न करता सर्वच समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवावेत, असेही त्यांनी म्हटले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.