मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे, तर नाणार प्रकल्पही महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याच्या चर्चा आहेत, या पार्श्वभूमीवर राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा होणार, याबाबत उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा येत्या २० तारखेपासून राज्यात दौरा आहे. ते कोकणातही जाणार आहेत, याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान वेदांता प्रकल्प हा पुन्हा महाराष्ट्रात आणा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज जळगाव येथे माध्यमांशी बोलताना केली.
अजित पवार म्हणाले, "'वेदांता'प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील दीड लाख लोकांना रोजगार हिरावला आहे, मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबध आहे, त्यामुळे त्यांनी मोदींना सांगून हा प्रकल्प महाराष्ट्र आणावा, दुसरा प्रकल्प येणाचे गाजर राज्य सरकारने दाखवू नये,"
"फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या हवाली केलं शिंदेंनी हातावर उदक सोडावा असा हा प्रकल्प सोडला उद्या हे याच पद्धतीने मुंबईच सौदा करण्यासाठी कमी करणार नाहीत,"असा गंभीर आरोप 'सामना'मधून करण्यात आला आहे.
"वेदांताबदल राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली पण त्यांच्याच मित्रानी 1 लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प हिरावून घेतला, महाराष्ट्राच्या प्रगतीचे सर्व डबे आणि इंजिन गुजरातला वळवतील हा धोका लक्षात घ्यावा," असा टोला अग्रलेखात लगावला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.