Uddhav Thackeray, Keshav Upadhye
Uddhav Thackeray, Keshav Upadhyesarkarnama

शिंदेंच्या सुरक्षेबाबत कांदेंच्या आरोपावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राला धक्का देणारी ही घटना आहे. राजकीय मतभेदाचे रूपांतर असे होता कामा नये,"

नवी मुंबई : "एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या सुरक्षितते विषयी आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय मतभेदाचे रूपांतर असे होता कामा नये," असे भाजपा (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सांगितले. (Keshav Upadhye news update)

माजी मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यास नकार दिला होता, असा आरोप शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंनी केला आहे. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या विषयावर केशव उपाध्ये म्हणाले, "सुहास कांदे यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण नक्षलसारख्या विषयी गंभीर नसणे, अशा पद्धतीने सुरक्षेबाबतची तडजोड करणे ते अतिशय धक्कादायक आहे. महाराष्ट्राला धक्का देणारी ही घटना आहे. राजकीय मतभेदाचे रूपांतर असे होता कामा नये,"

"एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांना देसाईंनी दुजोरा दिला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Keshav Upadhye
Suhas Kande : शिंदेंच्या हत्येचा कट होता ; तरीही उद्धव ठाकरेंनी झेड प्लस सुरक्षा नाकारली !

माजी मंत्री दादा भुसे यांनीही सुहास कांदेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. 'एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेच्या बाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. यावर चर्चा झाली होती,' असे त्यांनी सांगितले.

दादा भुसे म्हणाले, "ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून धमकी येताच त्यांच्या सुरक्षेबाबतचा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. मात्र यावर चर्चाच करण्यात आली नाही. शिवसेना वाढवण्यासाठी अनेकांनी जिवाचे राण केले. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र अशा कट्टर शिवसैनिकांकडेच दुर्लक्ष करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com