
Mumbai News : भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक इमारत अचानक कोसळली. यात इमारतीच्या राडारोड्याखाली ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
वल ग्रामपंचायतीच्या हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात ३० हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यांवर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे. भिवंडी अग्निशामक दालाच्या जवानांनी तेथील राडारोडा हटविण्यास सुरुवात केलले आहे. दरम्यान, एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत इमारतीत अडकेलेल्या एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जीवीतहनीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.