भाजप नेत्यांविरोधी वक्तव्य भोवलं; भास्कर जाधवांच्या सुरक्षेत कपात

Narayan Rane |Bhaskar Jadhav | भाजपविरोधी वक्तव्यांचे पदसाद उमटायला सुरुवात झाली आहे
Bhaskar Jadhav | Narayan Rane |
Bhaskar Jadhav | Narayan Rane |

Bhaskar Jadhav- Narayan Rane| ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर राणे-जाधव वादाची ठिगणी पडली आहे. भाजपविरोधी वक्तव्यांचे पदसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार कोसळ्यापासून भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नारायण राणेंनी ठाकरे गटावर आरोप केल्यानतंर भास्कर जाधवांनी राणेंना उत्तर देताना त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर आता जाधव- राणे संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे, त्याचेच पडसाद म्हणून काल जाधवांच्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप विरोधी वक्तव्ये केल्यानंतर भास्कर जाधवांची सुरक्षा काढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Bhaskar Jadhav | Narayan Rane |
भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला, अज्ञातांनी दगड-बाटल्या फेकल्या : राजकीय संघर्ष घरापर्यंत!

मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेने विरोधात अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका करत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला आला. यावेळी बोलताना जाधव यांनी भाजपावर आणि एकंदरीतच शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. राणे पिता-पुत्रांची नक्कल करत नारायण राणेंचा त्यांनी ‘कोंबडीवाले’ असाही उल्लेख केला.

“नारायण राणेंचं कायम एकच भाषण असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली, ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? मराठी माणूस संपला, शिवसेनेने काही केलं नाही. पण आता बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं. त्यावेळी तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सणसणीत टोला भास्कर जाधवांनी नारायण राणेंना लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com