Udayanraje Bhosale : पवार, गडकरींनी कोश्यारींवर तेव्हा आक्षेप का घेतला नाही ; उदयनराजेंचा सवाल

Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेदींना लाज वाटत नाही का ?
Udayanraje Bhosale latest news
Udayanraje Bhosale latest newsUdayanraje Bhosale latest news

Udayanraje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोश्यारी व त्रिवेंदी यांच्यावर हल्लाबोल केला. (Udayanraje Bhosale latest news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावरही उदयनराजेंनी टीका केली. कोश्यारी यांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले, तेव्हा व्यासपीठावर पवार, गडकरी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, यावर उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली.

Udayanraje Bhosale latest news
Sharad Pawar : कोश्यारींबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; पवार म्हणाले, "पंतप्रधान, राष्ट्रपतींनी.."

"शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं तेव्हा शरद पवार, नितीन गडकरी हे त्या ठिकाणी उपस्थित होते, तेव्हा त्यांनी राज्यापालांच्या या विधानावर आक्षेप का घेतला नाही," असा सवाल उदयनराजेंनी यावेळी उपस्थित केला.

Udayanraje Bhosale latest news
Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले ; सोलापूर आणि अक्कलकोटवर केला दावा

कोश्यारी व त्रिवेदी यांच्यावर उदयनराजे भडकले. "शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. उदयनराजे म्हणाले, "शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले आहेत, असे राज्यपालांचे विधान ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं. त्यांचा विधानाला काय आधार आहे.

अनेक राजे मुगलांना शरण गेले, पण शिवाजी महाराजांनी विरोध केला, जनतेला सन्मान मिळून देण्यासाठी त्यांनी लढाया केला. साम्राज्य वाढविण्यासाठी नव्हे तर त्यांनी सामान्यांसाठी लढाई केली,"

कधीही मीपणाला थारा दिला नाही

"छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, त्यांच्या विचारावर हा देश अखंड राहू शकतो.नाहीतर देशाचे तुकडं होतील. शिवाजी महाराजांनी त्यांचे कुटुंब मानले नाही तर देशाला त्यांनी कुटुंब मानलं आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही," असे उदयनराजे म्हणाले.

माफीनामा लिहून दिला याला पुरावा काय

"शिवरायांची विचारधारा सोडून चालणार नाही. त्यांनी रयतेचे राज्य उभं केले. कोश्यारींच्या व्यक्तव्यामुळे चीड येते. आता व्यक्तीकेंद्री झाले आहेत. त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे," असे ते म्हणाले. त्रिवेदी यांनी कोणत्या आधारे शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, त्यांना लाज वाटत नाही, शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहून दिला याला पुरावा काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com